State government scheme मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय?

मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय?

मंगळवार ३० मे २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

-कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता. लाखो कामगारांचे हित जपले.

कामगार विभाग
-केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

कृषी विभाग
-नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार

-“डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यातही राबविणार.

-सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. २२.१८ कोटी खर्चास मान्यता

-महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

पर्यटन विभाग
-राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

उद्योग विभाग
-कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

वस्त्रोद्योग विभाग
-सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार

सहकार विभाग
-बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय

नगरविकास विभाग
-अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार

उच्च व तंत्र शिक्षण विभाग
-नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता

जलसंपदा विभाग
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना जाहीर
-शेतकऱ्यांसाठी ६ हजारांच्या निधीत आणखी ६ हजारांची भर
-शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार
-राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद.

👉योजना साक्षर समृद्ध महाराष्ट्राची नवीन अपडेट्स येथे क्लिक करा